आनंद दिघे साहेबांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा जनसंपर्क आणि लोकांशी थेट नाळ जुडलेली होती. ते कोणत्याही पदावर नसतानाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध असत.
नागरिक आणि कार्यकर्त्यांना जोडणारा पक्षाचा हक्काचा व प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म
हे ॲप फेसबुक किंवा ट्विटरसारखेच असेल. यात नागरिक आणि कार्यकर्ते स्वतःची प्रोफाईल बनवू शकतील, एकमेकांना फॉलो करणे, पक्षाच्या पोस्ट टाकणे, लाईक आणि कमेंट करणे शक्य होईल.
कोणता कार्यकर्ता ग्राउंडवर काय काम करत आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येकाची वेगळी प्रोफाईल असेल. कार्यकर्ते त्यांनी केलेली कामे (उदा. रस्ते, मदत) 'Before & After' फोटोंसह इथे अपलोड करू शकतील.
एखाद्या नागरिकाला अचानक अडचण आल्यास (उदा. वैद्यकीय मदत), ॲपमधील SOS बटण दाबताच त्यांच्या GPS लोकेशननुसार सर्वात जवळच्या ५ शिवसैनिकांना लगेच अलर्ट जाईल. यामुळे पक्षाची मदत सर्वात आधी पोहोचेल.
नागरिकांना स्वतःचे नाव आणि नंबर लपवून स्थानिक समस्यांची किंवा गैरप्रकारांची थेट वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करता येईल. यामुळे पक्षात आणि प्रशासनात पारदर्शकता वाढेल.
जे कार्यकर्ते ॲपवर ॲक्टिव्ह राहून लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवतील, त्यांना सिस्टीम आपोआप 'Verified / Top Performer' अशी बॅज देईल. यामुळे खऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य ओळख मिळेल.
नागरिक त्यांच्या राज्य, जिल्हा, तालुका किंवा प्रभागानुसार कार्यकर्त्यांची यादी फिल्टर करू शकतील. तसेच विशिष्ट नेत्याचा ID टाकून त्यांची पूर्ण माहिती एका क्लिकवर पाहता येईल.
एखाद्या नेत्याची प्रोफाईल उघडल्यावर शेकडो पोस्ट वाचण्याची गरज नाही. AI एका सेकंदात त्या नेत्याच्या वर्षभराच्या कामाची ५-६ ओळींत 'समरी' देईल (उदा. 'यांनी १० पाणी प्रश्न सोडवले').
नागरिकांनी टाकलेली तक्रार (पाणी, रस्ते इ.) AI स्वतः वाचून ओळखेल आणि ती थेट संबंधित विभागाच्या कार्यकर्त्याला पाठवेल.
मी प्रकाश राठोड गेले २५ वर्षे ठाणे या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत वास्तव्यास आहे. या भूमीने अनेक चळवळी घडवल्या, अनेक लढे पाहिले. आणि याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेली शिवसेना कशी वाढली, कशी रुजली हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान म्हणजे मला आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभला. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेसाठीची तळमळ हे माझ्या कामाचा पाया आहे. म्हणूनच मी शिवसेनेच्या विचारधारेशी प्रेरित होऊन, महाराष्ट्र हितासाठी माझ्या नोकरीची १० वर्षे सेवा बाकी असताना सुद्धा स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेऊन शिवसेनेत सक्रिय झालो आहे.
आज मी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि बंजारा समाजाचे नेते तथा शिवसेनेचे कार्यकुशल मंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या सोबत काम करत आहे, हि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मी एक साधा शिवसैनिक आहे, पण मनात एक मोठं स्वप्न आहे... शिवसेना मनामनात, शिवसेना घराघरात !
याच उद्दिष्टाने आपण सर्वांनी एकत्र येऊन हे महाअभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचे आहे. हे फक्त अभियान नाही, हा आपल्या विचारांचा प्रसार आहे. हा आपल्या संघटनेचा विस्तार आहे. मी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून आवाहन करतो की या अभियानात सक्रिय सहभागी व्हा.
चला, एकत्र येऊया, शिवसेना अधिक बळकट करूया !